Sakshi Sunil Jadhav
बऱ्याचदा आपल्या घरात कुकरमध्ये भात तयार केला जातो. कारण तो ३ शिट्ट्यांमध्ये लगेचच तयार होतो. पण भात त्यामध्ये चिकट होत असतो.
भातामध्ये असलेला एमायलोपेक्टिन स्टार्च गरम पाण्यात मिसळल्यावर भातातला चिकटपणा वाढतो. जास्त पाणी वापरल्यामुळे हा चिकटपणा आणखी वाढतो.
भात शिजवण्यापूर्वी 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवा. याने जास्तीचा स्टार्च निघून जातो आणि भात मोकळा होतो.
अनेकजण भात फक्त एकदाच धुतात, जे चुकीचं आहे. असं केल्यावर भात चिकट आणि गुळगुळीत होतो.
1 कप बासमती तांदळासाठी दीड कप पाणी पुरेसं असतं. जास्त पाणी घेतल्यावर भात मऊ किंवा जास्त चिकट होतो.
भात नेहमी मध्यम आचेवर शिजवा. जास्त आचेवर शिजवल्यामुळे तो भात खराब होतो किंवा कच्चा राहू शकतो.
भात शिजवताना 3 शिट्ट्या झाल्यावर लगेच गॅस बंद करा. जास्त शिट्ट्या झाल्यावर भात चिकट होतो किंवा करपतो.
कुकर थंड होईपर्यंत वाट बघा. यामुळे तांदळाचे दाणे व्यवस्थित सेट होतात.
बासमती तांदूळ वापरल्यावर भात जास्त मोकळा-मोकळा बनतो. जुने तांदूळ तुम्ही खाऊ शकता.